in

Post Title

MarathiBlogs - Marathi Bloggers Network
आजच्या खास दिवसाची कविता

तुला कधी जाणवते का रे
हा जो आपला संसार आहे
जिथे आपण दोघे नाही तिघे आहोत
जणू एका नात्याच्या धाग्याने आपण तिघे घट्ट बांधले गेलेले
तू, मी आणि देव एका चिमुकल्या जागेत
संसार करू पाहणारे आपण तिघे जण
एकमेकांशी जुळवून घेत चाललेला आपला संसार
आपण रोज तिघेही काडी काडी जमवतो
आणि संध्याकाळी घरट्यात परततो
एक अतूट प्रेमाचा बंध तिघांना एकत्र बांधतो
प्रेम चिंता भांडणे ओढ काळजी तिघांनाही
कोणी छोटा मोठा असे काही आपल्यात उरत नाही
एकमेकांवाचून हा संसार पुरा होत नाही
————————————————————

तू नेहमी म्हणतोस ना
की तुझ्याहून अधिक तू मला कळतोस
हो … किती खरे आहे हे
कारण माझ्या अस्तित्वाचे कारणच मूळी तू आहेस
मी आले आहे या जगात ते कारण
मला दगडातून तासून हिरा मिळवावा
तसे मिळवायचे आहे मला
तुझ्यातून तुलाच
आणि माझ्या हृदयात ठेवायचे आहे
तेंव्हा कुठे या देहात प्राण भरेल
तुलाच कधी उमजले नाही असे तुझे मन
जपायचंय माझ्या इवल्याशा ओंजळीत
फुलासारखे
माझ्या हृदयात जपलेला तू
माझ्या ओंजळीत भरून राहिलेले तुझे मन
आणि त्याच वेळी माझ्या मनात उमटणारी
एक प्रार्थना …..
आपले सारे जग तेजोमय करून टाकेल 
– अनघा

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Anagha Apte

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

अभंग-संत तुकाराम महाराज (Abhanga Sant Tukaram Maharaj)

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

एक दिवस कवितेचा ……