रोजे आत्म्याला तेजस्वी प्रकाश देतात व कॅन्सरपासून वाचवतात
वसंत श्रुतूमध्ये निष्पर्ण झालेल्या झाडांना कोवळी लुसलुसीत पालवी फुटते. वृक्षवल्ली बहरलेली दिसतात. कोकिळेची मधुर स्वरातील तान ऐकू येते. सृष्टीवर सर्वत्र नवा उत्साह, नवा जोम जाणवू लागतो. सर्वांच्या मनात आनंदाचा संचार होवू लागतो. जवळपास हीच अवस्था रमजान महिन्यात दिसू लागते. हा महिना सत्कर्माचा मानला जातो. पवित्र रमजान महिना आला की, वातावरणात नेकीचे म्हणजेच चांगुलपणाचे वारे वाहू लागतात. रमजानच्या आगमनानिमित्त जाणवणाऱ्या शुभ हालचालीमुळे प्रसन्नता जाणवते.
या महिन्यात मुस्लिम बंधुभगिनी भक्तिभावाने उपवास करतात. भल्या पहाटे उठून नाष्टा करतात. त्याला सेहरी म्हणतात. दिवसातून पाच वेळा उपवासाबरोबर नमाज पठण करतात. कुरआन वाचन करतात. बरेच जण पहाटेची ताहज्जुदची नमाज पठण करतात. यावेळी सर्वांची मने भक्तीरसात डुंबलेली असतात. प्रत्येकजण जास्तीत जास्त इबादत (भक्ती) करून सवाब म्हणजे पुण्य पदरी पाडून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतात. कारण अल्लाहच्या आदेशान्वये या महिन्यात सैतानाला कैद करण्यात येते. म्हणजे सत्कर्माना चालना देण्यास अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात येते.
प्रत्येकाने सत्कर्मासाठी प्रयत्नशील रहावे कारण अल्लाह प्रत्येकाच्या मनातले जाणणारा आहे. त्याला सर्व ज्ञात आहे. तुम्ही अल्लाहसाठी एक पाऊल चालतात तर अल्लाह तुमच्यासाठी दहा पावले चालत येतो. म्हणून तुम्ही अल्लाहसाठी चालत रहा. तो तुमच्यासाठी धावत येईल. रमजानच्या आध्यात्मिक महिन्यात सत्कर्माची म्हणजे पुण्याची पाने जणू काही बहरतात. रोजे धारकांची मने प्रसन्न होतात. या जाणीवेलाच इस्लामी तर्कशास्त्रात बरकत असे म्हटले आहे. काही अभ्यासक रमजानच्या महिन्याला फस्ल की कटाई का महिना म्हणजे सुगीचा महिना म्हणून देखील संबोधतात. काहींच्या मते आत्म्याला तेजस्वी प्रकाश देणारा महिना आहे. कारण उपवासाच्या काळात मनुष्य आपल्या अंतःकरणात डोकावून पहातो. भूक म्हणजे काय हे त्याला नेमके समजते. अविरत बरसणारी अल्लाहची दया, कृपा उपवासकर्त्याला सुखावून जाते. त्याचा आत्माही सुखावतो. उपवासकर्ता सज्जन व मवाळ बनतो. रोजा मनुष्याच्या आत्म्याला तेजस्वी प्रकाश देतो ही झाली रोजाची भावनात्मक बाजू. रोजामुळे शरिराला काय फायदे होतात ते पाहू.
रमजान महिन्यातील रोजे म्हणजेच उपवास करणे ही इस्लाम धर्मातल पाच उपासनांपैकी एक उपासना आहे. या उपासनेमागील शरीर विज्ञान एका व्हिडीओमुळे मला समजले. हजरत मुहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहिवस्सलम यांनी आपल्या अनुयायांवर रोजे सक्तीचे का केले आहेत ? तर अनुयायांचे आरोग्य चांगले रहावे, त्यांना कॅन्सरसारखा दुर्धर आजार होवू नये म्हणून. त्या व्हिडीओतील वैज्ञानिक माहिती रसिक श्रोत्यांसाठी देत आहे.
३ ऑक्टोबर २०१६ साली योशिनोरी ओशमी या जपानी शास्त्रज्ञाला नोबेल प्राईज फॉर मेडिसीन दिले गेले. मेकॅनिझम फॉर ऑटोफॅगी त्याच्या संशोधनाचा विषय होता. नोबेल प्राईज प्रदान झाल्यानंतर त्यांना विचारले गेले की, ज्यामुळे आपल्याला जगातील सर्वात मोठा पुरस्कार नोबेल प्राइज दिला गेला .त्याकरिता तुम्ही अशी कोणती गोष्ट शोधून काढली. योशिनोरी ओशुमी म्हणाले, मी कॅन्सर न होण्याच्या संभाव्य औषधांचा शोध लावला. या उत्तराचे जगाने जोरदार स्वागत केले आणि म्हटले, “तुम्ही कॅन्सर न होण्याचे औषध शोधून काढले ? ओशुमी म्हणाले, हे औषध नाही, परंतू, एक खात्रीलायक उपाय म्हणजे प्रिकॉशन मी शोधून काढले आहे. जगातील प्रत्येकजण म्हणाला, ‘सांगा, सांगा असा कोणता उपाय आहे. ते म्हणाले, ज्यावेळेस आपण उपाशी राहतो. त्यावेळी आपल्या शरीरातील पोषणतत्वे म्हणजे न्यूट्रीयन्स संपून जावू लागतात. भूक लागते पण काही खाल्ले जात नाही. अशावेळी शरीरातील सडलेल्या, कुजलेल्या भागाला, जंतूना शरीरातील पेशी खाऊ लागतात. या क्रियेला वैज्ञानिक भाषेत ऑटोफॅगी म्हणतात. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या शरीरातील कुजलेल्या, सडलेल्या भागांना, जंतूना शरीरातील इतर पेशींनी खाऊन टाकावे तर त्यासाठी तुम्हाला उपाशी रहावं लागेल. असा शोध मी लावला आहे. जेव्हा शरीरातील पेशी अशा भागांना खाऊ लागतील. त्यावेळी कॅन्सरचा परसंटेज कमी होत जातो. लोकांनी त्यांना विचारले, ‘माणसाला वर्षभरात यासाठी किती दिवस उपाशी रहावं लागेल? त्यांनी सांगितले २० ते २५ दिवस दररोज ९ ते १० तास उपाशी रहावं लागेल. जो अशाप्रकारे उपाशी राहील त्याच्या शरीरातील पेशी त्याच्याच शरीरातील मलीच्छ भागाला खाऊन टाकतील व उपवासकर्ता कॅन्सरपासून आपला बचाव करू शकेल.


GIPHY App Key not set. Please check settings